Friday 13 February 2015

लेख #२ - आयुष्याचा जोडीदार!!!



          लग्नसराइचे दिवस चालले आहेत.  जिथे तिथे लगीनघाई पाहायला मिळत आहे.  वधू-वर दोन्ही आप-आपल्या भावी जोडीदाराच्या स्वप्नांत आणि अपेक्षेत गुंतले आहेत.  घराच्या मंडळींची लग्नाच्या गडबडीमुळे नुसते धावपळ चाललेली आहे.  सगळं कस आनंदाला उधान आल्याप्रमाणे लगीन सराईचा घाट असतो ना!

         जे जोडीदार लग्न करणार आहेत आणि ज्यांची लग्न झालेली आहेत ते आप-आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा करत असणे हि अगदी साहजिकच आहे.  भावी जोडीदार तसेच नवरा बायको आपल्या जोडीदाराला जितकं समजून घेईल तितके प्रेम वाढते.  आता बरेच जण म्हणतील बोलणे सोपं आहे, प्रत्यक्षात ज्याचं त्यालाच सावरायचा असतं.  हो बरोबर आहे हेही.  पण, समाजात माणसाच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत असतात.  कधी चांगल्या तर कधी वाईट.  माणूस विचारांच्या कचाट्यात असा काही अडकून पडतो कि, बरोबर काय नि चूक काय? ह्याचा अंदाज बांधणे कठीण होते.  ज्यावेळी आपण अश्या समस्येत अडकतो तेव्हा नैराश्याने एवढे ग्रासून जातो कि जीवनाचा अंत ह्या पलीकडे आपणाला पर्याय हि दिसेनासा होता आणि हि दैना आपण आपली स्वतःच्याच मताने करून घेतो बरं का?  कारण स्वतः केलेल्या चुकांची शिक्षा भोगणे हे आपल्याला कठीण वाटते.  आणि आपण हे विसरतो कि, "आयुष्य हि परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे.  संकटं जशी येतात तशी आल्या पावले निघूनही जातात.  त्यासाठी आपण आपली विचारसरणी हि उत्तम ठेवेणे आवश्यक आहे.  कारण परमेश्वराने प्रत्येकाला संकटाचे बळं हे दिलेलेच असते".

         माणूस एकटा आयुष्य जगणं हि कठीण बाब आहे.  त्यामुळे जी व्यक्ती आपल्याला आनंदी ठेवेल अश्या व्यक्तीच्या आपण शोधात असतो.  असं कोणी भेटले कि त्याचे रुपांतर प्रेमात होते.  हं, हे झाले लग्न अगोदरचे.

       लग्नानंतर आपल्या जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टी मध्येहि खटके उडाले तरी आपण स्वतःला किवा समोरच्याला दोष देऊन आपल्या अपेक्षांच्या भंग झाल्याप्रमाणे वागतो.  त्यामुळे लग्नानंतर विवाहित असूनही प्रेम होण्याची कारण कोणती असू शकतील ह्याला मार्ग अनेक आहेत.  मुळात, प्रेमामध्ये माणूस स्वतःच एक अलिखित करार बनवतो आणि तो समोरच्यावर लादतो ते म्हणजे, माझ्या जोडीदाराने (आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती म्हणजे नवरा बायको किंवा भावी जोडीदार) मला समजून घेणे.  हो ना?  कळत-नकळत प्रत्येक जण ह्या करारात अडकतोच.  जेव्हा हा करार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर पूर्णपणे मोडून निघतो, अशावेळी झालेले लग्नं हे प्रेमविवाह असो कि ठरवून झालेले लग्नं.  ते 'प्रेम' ह्या आभासी शब्दामागे कळत नकळत धावू लागते.  त्यामुळे अश्या व्यक्ती सहजच ज्यांना त्या पसंद करतात आणि जेथून त्यांना आनंद मिळतो अश्या गोष्टींकडे धावतात.  त्यातले काही जण स्वतःला सावरतातही पण काही जण मात्र स्वतःच्या इच्छा आकांशाच्या मोहात अडकून पडून स्वताला चुकीच्या मार्गावर नेतात आणि मनाप्रमाणे भरकटतात.  पण कधी ना कधी अश्या व्यक्ती संकटात सापडतात आणि तिथून पुढे मग संसारात खटके उडायला सुरुवात होते.  तेव्हा पुन्हा आपल्याच माणसांचा आधाराकडे आणि आधारासाठी धाव घेणारे भरकटलेले जीव आणि आपल्या जोडीदाराच्या चुकांना माफ करणारे तसेच आपला संसार पुन्हा नव्याने सुरळीत चालवा म्हणून अश्या व्यक्तींना माफही करतात आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुढाकारही घेतात.

        पण असं असूनही जिथे संशयाची सुई टोचली तिथे कधीना कधी पुन्हा त्याच गोष्टीवरून त्यांच्यात खटके उडणे साहजिकच आहे.  त्याचे कारणही अगदी तसेच, 'आपण त्या व्यक्तीला माफ केले ही भावना आपण स्वतःच्या आणि त्यांच्या मनात रुजवतो कि मी तुला माफ केले'.  हा मानवी स्वभावाच आहे.  आणि आपण असे करतोही अगदी कळत नकळततेने.  ह्याच गोष्टीचा विपिरीत परिणाम नवरा-बायकोत होऊन वादविवाद निर्माण होतात, संसारात खटके उडायला पुन्हा सुरुवात होते आणि हेच त्यांच्या आनंदी आयुष्यावर खोलवर परिणाम करतात.

      चुकलेली वाट पुन्हा मिळविता येते हो!  इतकी छोटीसी गोष्टही आपण विसरतो.  लग्नं म्हणजे एकमेकांच्या सहवासाने जोडीने आयुष्य जगणं.  एक चुकला कि दुसऱ्याने धीर देऊन त्याला सावरणं.  जशी चुकलेली वाट पुन्हा मिळविता येते तसेच अगदी संसाराचेही आहेच की.  पण त्यासाठी तुम्ही तुमचा हक्क, 'मी' पणा, अहंकार सोडवा आणि मुख्य म्हणजे माफ करण्यापेक्षा त्या व्यक्तीला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयास करा.  भांड्याला भांड लागले कि आवाज हा येणारच ना!  तसेच संसाराचेही असते.  एकमेकांच्या समजुतीचा आधार होऊन पहा, आयुष्य खूप सुंदर वाटेल.

       समोरच्याला माफ करण्यापेक्षा समोरच्याला समजून घेवून त्याला आणि स्वतःला त्यातून सावरणं हे खूप गरजेचे असते.  कारण कितीही झाले तरी आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी सर्वकाही सोडले असते.  जरी आपण चुकलो किंवा समोरचा चुकला तरी त्या चुकांचे समर्थन करण्यापेक्षा समोरच्याला एवढे प्रेम द्या कि, तो आणि आपण सर्वकाही चुकीच्या गोष्टी विसरून जाऊन पुन्हा प्रेमाचा बहर नव्याने फुलेल.  प्रेमाची ताकदच भारी हो.

        दोघांनी एकमेकांना माफ केले असं न समजता तसेच ती गोष्ट मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात न ठेवता एकमेकांना जेवढं समजून उमजून घेता येईल तेवढे तुमचेच प्रेम वाढत जाईल.  कारण प्रेम हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीच असते.
                      

                                                                                                      अनुप्रिया ठोंबरे-सावंत.

मागील कथा वाचा                                                                                               पुढील कथा वाचा 

2 comments:

  1. अनुप्रिया, "दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव " हे माहीत असूनही संशय , कुशंका ह्यांनी मने कलुषित केली तर तेच जीवन गढूळ, दुर्गंधी साचलेल्या पाण्याचे डबके बनायला वेळ लागत नाही. परंतु सामंजस्य असेल तर आयुष्यात सहज साध्य अशक्य गोष्टी घडू शकतात.
    पती-पत्नीचे नाते सामंजस्य, प्रेमातून अत्यंत सुंदरपणे कसे बहरू शकते ह्याचे वास्तव भान करून देणारा अप्रतिम लेख... खूप आवडला.

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.